Sunday, May 31, 2009
रेखाचा गुस्सा!
published in mumbai sakal 30 may
न्यूनगंडाची भाषा
published in mumbai sakal 28 may
ना हरकत!
published in sakal mumbai 27 may
Tuesday, May 26, 2009
कार्ड मनसेचं!
published in sakal mumbai 26 may 2009
Sunday, May 24, 2009
गर्दीत माणसांच्या...
published in mumbai sakal 23 may 09
गाव तिथं मर्सिडिझ...
लाल डबा असं म्हटलं की वेगळं काही सांगावं लागतं? नाही ना?लाल डबा म्हणजे आपली एसटी... आपल्या खऱ्याखुऱ्या भाषेत सांगायचं तर यष्टी!चांगलीचुंगली माणसं आजकाल तिला नाकं मुरडतात. कोण जाणार त्या लाल डब्यातून, असं म्हणतात.त्यांना हवी असते चकचकीत दिसणारी, गुबगुबीत खुर्च्या असलेली, पोटातलं पाणीही हलणार नाही, अशी एसी बस. ती ठरल्या ठिकाणाहून निघते, ठरल्या ठिकाणीच पोहोचते, वाटेत तिला फूड मॉल लागतात. तिथं सगळंच दुप्पट-तिप्पट किमतीला मिळतं.ती स्वतः एसटीच्या दुप्पट-तिप्पट पैसे घेते; पण पैसेवाल्यांना हवा असतो तो सगळा "कम्फर्ट'. तिथं अगदी पैसा वसूल असतो.आणि एसटी?विकत घेतानासुद्धा नवीन घेत नसावेत, असं तिचं रूपडं!हजार ठिकाणी ठोकलेली, पोचे आलेली, खिडक्या कधी उघडण्यासाठी नसाव्यातच आणि उघडल्या तर बंद होण्यासाठी नसाव्यात... ठिकठिकाणी गाडीत पान खाऊन काढलेली नक्षी... बंद पडू नये म्हणून सुरूच ठेवायची ती खास भारतीय स्ष्टाईल... आणि एकदा गाडी सुरू झाली की प्रवाशांना कंटाळा येऊ नये म्हणून खिडक्या दारांच्या खडखडाटाचं ते बॅकग्राउंड म्युझिक... दणकून आपटल्याशिवाय नीट बंदच न होणारे ते दरवाजे...किती गोष्टी सांगाव्यात यष्टीच्या?याच यष्टीनं आधुनिक व्हायचं ठरवलं तेव्हा विक्रम गोखलेंना ब्रॅंड ऍम्बॅसॅडर म्हणून आणलं होतं. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे काल सगळीकडे झळकलेल्या बातम्या.पुणे मुंबई प्रवासासाठी एसटीने आता मर्सिडिझ बेंझ कंपनीच्या बसची सेवा द्यायला सुरुवात केली आहे. आधी वोल्व्हो होतीच. आता मर्सिडिझ बेंझ!किती बदलला जमाना. ेएकेकाळी- एकेकाळी कशाला- 1982 मध्ये दिल्लीत एशियाड झालं तेव्हा सरकारनं आणलेल्या निमआराम गाड्याचंही केवढं कौतुक झालं होतं. आजही त्या गाड्यांना एशियाडच म्हणतात. म्हणजे एसटीचा प्रवास लाल डब्यापासून मर्सिडिझ बेंझपर्यंत!या सगळ्या काळात एसटीनं काय काय पाहिलंय.हळूहळू ती तोट्यात गेली. त्याला तिच्या गैरकारभाराची, बेशिस्तीची, अरेरावीची जोड होतीच. गावोगावी बेकायदेशीर खासगी वाहतूक त्यातूनच वाढत गेली.साताठ जणांची क्षमता असणाऱ्या गाडीत पंधरा-पंधरा जण वाहून नेणारे खासगी व्यावसायिक वाढले. लांबच्या प्रवासासाठी लक्झरी बस आल्या. अगदी एसटीनंही वोल्व्हो सुरू केल्या.पण लाल डब्याची एसटी ती एसटी. तिच्या सगळ्या दुर्गुणांसकट तिला एक मानवी चेहरा आहे. प्रत्येक गाव आणि प्रत्येक रस्ता तिला माहिती आहे. गाव तिथं एसटी हे ब्रीदच होतं तिचं!त्या रस्त्यावरून, त्याच लाल डब्यातून तालुक्याच्या गावाला जात किती पिढ्यांची शिक्षणं झालीत. फक्त एवढंच नाही, तर एसटी आहे या भरवशावर किती आयाबायांनी अगदी विश्वासानं आपल्या पोरीबाळींना शिकायला पाठवलंय. किती आजारी माणसं आणि किती अडलेल्या बायकांना तालुक्याच्या गावाला पाठवून एसटीनं किती जीव वाचवलेत.अगदी दुर्गम भागातल्या किती गावांना दिवसातून एकदा तरी जाऊन एसटीनं त्यांना जगाशी जोडलंय.हे सगळं करताना कधी फायद्या-तोट्याचा प्रश्नच नव्हता.माणसं महत्त्वाची होती. तीही कुणी पैसेवाली, व्हीआयपी नव्हे तर खेड्यापाड्यात राहणारी. ज्यांच्या हातात पैसा फारसा खुळखुळत नसतो अशी. खरीखुरी जनता!पैसेवाल्यांकडून पैसा ओढणाऱ्या गाड्या कुणीही उडवील. मर्सिडिझ बेंझच्या गाड्या आणून एसटीनंही ते ओढावेत. अगदी उद्या "गाव तिथं मर्सिडिझ' अशी घोषणा करण्याची ऐपत एसटीवर येवो.पण एसटीनं आपला मानवी चेहरा विसरू नये एवढंच!
published in sakal mumbai 22 may 09
अहो ऐकलंत का?
published in sakal 21-05-09
Friday, February 27, 2009
आपण सही तरी मराठीत करतो का?
"सलाम बॉम्बे'पासून "सलाम गरिबी'पर्यंत
पूर्वप्रसिध्दी सकाळ, 24 फेब्रुवारी
Tuesday, February 10, 2009
"लिटील चॅम्प'नं महाराष्ट्राला काय दिलं?
published in mumbai sakal on 10 feb 2009
Wednesday, February 4, 2009
त्या मुली याच ना?
तेवढ्यात मागून अपेक्षित आवाज आलाच, "एक्सक्यूज मी, ये लेडीज सीट है' तो उठला. आणि एक चांगलीच उंच मुलगी माझ्या शेजारी येऊन बसली.
तिनं पाठीमागे बघत "थम्पस अप'ची खूण केली आणि मागून एकच गलका आला "दीदीला सीट मिळाली,'..."दीदीला सीट मिळाली,'.
"आप कहॉं उतरनेवाली है?' तिनं मला विचारलं.
"माजिवाडा'.
ती तशीच बसल्याबसल्या मागे वळून ओरडली,
"ए गौरी, विद्या, पमा... कुणीतरी पुढे या गं... इथं एक माजिवाडा सीट आहे!'
तेवढ्यात तिनं पुढच्या सीटवर बसलेल्या माणसालाही विचारलं,"तुम्ही कुठं उतरणार?'
"कॅडबरी' एकजण म्हणाला,
"तत्वज्ञान' दुसऱ्यानं सांगितलं.
दोन बाजूंच्या दोन्ही सीटच्या मधल्या जागेत दाटीवाटीनं माणसं उभी होती. तरीही तिनं बसल्याबसल्या इकडूनतिकडून डोकावत पलीकडच्या लोकांना विचारलं...
कहॉं उतरेंगे?
"कापूरबावडी' "दहिसर'
"ए मुलींनो पुढे या गं सगळ्यांनी. इथं सीट आहेत' तिनं मागे बघून आवाज दिला, तशा मुली सरकत सरकत पुढे यायला लागल्या. सगळ्यांच्याच खांद्यावर सॅक. आठ नऊजणी होत्या. सगळ्या अठरा ते 20 च्या आसपासच्या. त्यांच्या आरड्याओरड्यामुळे एव्हाना सगळ्या बसचं लक्ष या मुलींकडे, त्यांच्या दीदीकडे, त्यांच्या गडबड गोंधळाकडे वेधलं गेलं होतं. बसमध्ये दाटीवाटीनं उभ्या असलेल्या गर्दीला पार करून तीनचार जणी दीदीजवळ पोहोचल्या. तिनं भरभर त्यांना माजिवाड्याला कोण उतरणार, कोण कॅडबरीला आणि कोण तत्वज्ञान विद्यापीठाच्या स्टॉपवर याची माहिती सांगून त्यांना सीटसाठी क्लेम लावायला पिटाळलं. वर म्हणालीही लोकलमध्ये आपण लावतो ना तसाच क्लेम लावा. मुली तशाच गर्दीत त्या त्या सीटकडे सरकल्या आणि आणि त्या सीटवर बसलेल्या माणसांना तुम्ही उठाल तेव्हा आम्हाला तुमच्या जागा द्या म्हणून सांगायला लागल्या. एव्हाना "दीदी'नं अजून पाठीमागेच असलेल्या तीनचार जणींनाही हाका मारून अशाच पध्दतीनं कुणाकुणाला विचारून जागांना क्लेम लावून दिला होता. हे सगळ इतकं पटपट सुरू होतं की आसपास गर्दीत कसरत करत उभे असलेले सगळे अवाक होऊन बघत होते. मुंबईत लोकलमध्ये लेडीज डब्यात जागांना क्लेम लावायची पध्दत आहे. डब्यात चढल्यावर बसलेल्यांना पटपट कुठे उतरणार हे विचारलं जातं. जी त्यातल्या त्यात आधी उतरणार असते तिच्या जागेवर क्लेम लावला जातो. लेडीज डब्यात क्लेमला कायद्याइतकं महत्त्व आहे. गंमत म्हणजे ही भानगड पुरूषांच्या डब्यात नसते. जो कुणी उठेल तिथं जवळपास उभा असलेला माणूस त्या जागेवर बसतो. पण इथं या पोरींनी रेल्वेस्टाईल क्लेम लावून जागा बळकावून टाकल्या होत्या. आसपास उभ्या असलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी होती. रात्रीची वेळ. सगळेच दमून आलेले. टेकायला मिळालं तर प्रत्येकालाच हवं होतं. त्यात या पोरींनी चलाखी केली होती. जागा सहज मिळाली तर बसायचं असं न करता त्यांनी त्या मिळवल्या होत्या. अजून त्या उभ्याच होत्या. पण आता लौकरच बसायला मिळणार या आनंदात त्यांचा गलका वाढला होता. पुढे बसलेल्या, मधे बसलेल्या, मागे बसलेल्या असा सगळ्यांचा सुखसंबाद सुरू झाला. आपण बसमधे आहोत, सगळी गर्दी आपल्याला बघते आहे, ऐकते आहे हे लक्षातही न येता त्या मुक्तपणे एकमेकींना हाका मारत, एकमेकींच्या टोप्या उडवत त्यांची धमाल सुरू होती. कॅडबरीचा एक मोठा बारही वाटून झाला. तो एकमेकींकडे पोहोचवण्यासाठी त्यांनी गर्दीचीच मदत घेतली. कुणाकुणाचं हाफ तिकीट काढायचं आणि कुणाचं फुल असे विनोद करून झाले. एव्हाना सगळ्या बसला यातली गौरी कुठली, विद्या कुठली, नीता कुठली आणि दीदी कोण हे समजलं होतं.
मलाही राहवेना. मी माझ्या शेजारी बसलेल्या "दीदी'ला विचारलं,
"कुठे जायचंय तुम्हाला सगळ्यांना?'"
वसईला'
"मग इथून ठाण्यातून थेट वसई बसेस आहेत'
"ना. त्यांची शेवटची बस रात्री साडेआठला गेली. आमचा कार्यक्रम संपायला उशीर झाला.'
"कसला कार्यक्रम?'
"म्हणजे मॅचेस होत्या. त्या संपल्यावर बक्षीस समारंभ होता. तो उशिरा संपला.'
या मुलींबद्दल कुतुहल वाटल्यामुळे म्हणा किंवा कानावर पडतंच होतं म्हणून म्हणा आमचा संवादही आसपासची गर्दी एकत होती.
"कसली मॅच? काय खेळता तुम्ही लोक?'
"कबड्डी'
"अरे वा! कॉलेजची टीम आहे वाटतं!'
"नाही. आमची एका क्लबची टीम आहे. पण या सगळ्या मुली कॉलेजात शिकतात. मी त्यांची कोच आहे. म्हणजे मी पण खेळते. पण मी कोच आहे आणि प्लेअरपण'
हे सगळं बोलताना तिचं लक्ष "तिच्या' मुली, त्या काय करताहेत, नीट उभ्या आहेत ना याकडेच होतं.
"आता बस घोडबंदर रोडला लागली की होईलच रिकामी. मिळतील त्यांना जागा' मी म्हटलं.
"ते ठीक आहे हो. पण दिवसभर खेळून दमल्यात ना सगळ्या... म्हणून...'
तिनं आणखी एक कॅडबरीचा बार काढून तो मुलींकडे पाठवायला सुरूवात केली.आमचा संवाद ऐकणाऱ्यांचे सगळ्यांचे चेहरे एव्हाना बदलले होते. जागा मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या, गोंधळ घालणाऱ्या या मुली आधी सगळ्यांना निव्वळ बालिश, स्वार्थी वाटल्या होत्या. पण आता ते संपलं होतं. या मुलींचा गोंधळ म्हणजे त्यांचा किलबिलाट झाला. त्यांचा चाललेला दंगा हा त्यांचा खोडकरपणा, अवखळपणा वाटायला लागला. त्यांचं एकमेकांच्या टोप्या उडवणं लोक एन्जॉय करायला लागले. त्या खेळून दमून आल्या आहेत हे कळल्यावर तर एकदोघांनी उठून त्यांना बसायला जागा दिली.
त्या त्यांची कबड्डीची मॅच जिंकल्या होत्या की नाही माहीत नाही, इथं मात्र त्यांनी वातावरण जिंकलं होतं. काहीही न करता त्यांनी बघणाऱ्यांची "नजर' बदलवून टाकली होती.
नाराजीपासून कौतुकापर्यंत!
माझा सगळा प्रवास इनमिन दहा मिनिटांचा. तेवढ्यात या मुलींनी बसचा सगळा मूडच बदलून टाकला होता. आणि आपण काय केलंय हे त्यांच्या गावीही नव्हतं.
त्या एकमेकींमध्येच होत्या.
तशाच... स्वच्छंद.. अवखळ... मोकळ्या!
महात्मा फुले, महर्षी अण्णासाहेब कर्वे...
तूम्हाला अपेक्षित होत्या त्या मुली याच ना?